मानवाच्या गतकाळातील समूहजीवनाच्या संदर्भाकडे पाहता ते संघर्षमय असल्याचे दिसते. त्यांचा वारसा वर्तमानातही टिकून आहे. प्रत्येक सजीव आपले अस्तित्व टिकविण्यासाठी, हक्कासाठी संघर्ष करण्यास तयार होतो. त्या संघर्षाला व्यापक रूप प्राप्त झाले की, चळवळीची निर्मिती होते. जगात अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक, वांशिक चळवळी निर्माण झाल्या. त्यानुषंगाने आदिवासी चळवळीचा विचार आपणास करता येईल. आदिवासी हे या भूमीचे आदिपूत्र आहेत.
प्राचीन काळी त्यांची विविधतेने नटलेली व समृध्द राज्ये होती. देवदेवता, प्रथा, परंपरा, रितीरिवाज व निसर्गानुरूप जीवन जगण्याची पद्धती अशी स्वतंत्र संस्कृती होती. पण बाहेरून आलेल्या आर्यानी त्यांच्यावर आक्रमणे करून आदिवासींची राज्ये नष्ट केली. त्यामुळे त्यांना जंगल, दऱयाखोऱयांचा आश्रय घ्यावा लागला. तेव्हापासून आदिवासी समूहाची हेळसांड सरू झाली. याची जाणीव झाली झाल्यावर आदिवासी समूहाने आपल्या हक्कासाठी संघर्ष केलेला आहे. बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, राणी दुर्गावती, झलकारी देवी, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे, संभाजी नखाते, गया मुंडा अशा अनेक आदिवासी कांतिकारकांनी आपल्या अस्तित्वासाठी, हक्कासाठी, भूमीसाठी बलिदान दिले. त्यांचे सामाजिक चळवळीचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. या सर्व क्रांतिकारकांतील बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य व योगदान आदिवासींसाठी आजही प्रेरणादायी ठरलेले आहे
बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे नायक होते जे आदिवासी समाजातील लोकांसाठी लढले. देशाच्या स्वातंत्र्यात आणि आदिवासी समाजाच्या उत्थानात त्यांचे मोठे योगदान होते. यामुळेच त्याला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. ब्रिटिश राजवटीचा वाढता दडपशाही पाहून बिरसा मुंडा यांनी वयाच्या 25 व्या वर्षी इंग्रजांविरुद्ध बंड केले. त्याचा प्रभाव इतका होता की ब्रिटिश सरकारने त्याच्या अटकेसाठी 500 रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. ते जगातील पहिले लोकनायक होते ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीबरोबरच समाजसुधारणेची भाषा केली.
बिरसा मुंडा यांच्या जन्माबाबत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या तारखा नमूद केल्या आहेत . परंतु भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी कुमार सुरेश सिंग यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार, त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी 19व्या शतकाच्या अखेरीस बंगाल प्रेसिडेन्सीमधील खुंटी येथील उलिहाटू येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण चाईबासा येथील जर्मन मिशन स्कूलमध्ये झाले. बिरसांची क्रांतिकारी वृत्ती त्यांच्या अभ्यासादरम्यान दिसून आली.
बिरसा मुंडा यांनी उलगुलन नावाची चळवळ सुरू केली. हे आंदोलन सरदार आणि मिशनऱयांच्या विरोधात होते. जे प्रामुख्याने खुंटी, तामर, सरवडा आणि बांडगाव येथे केंद्रित होते. जमीनदार आणि पोलिसांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत असताना त्याविरोधात आवाज उठवण्याचा विचार त्यांनी केला. इंग्रजांनी केलेल्या भाडेमाफीलाही त्यांचा विरोध होता. ब्रिटीश अधिकारी आणि मिशनरी पूर्णपणे माघार घेतल्यानंतरच हे शक्य झाले. त्यावेळची परिस्थिती अशी होती की ब्रिटिशांनी आदिवासींना स्वतची जमीन वापरण्यास बंदी घातली होती. या कारणांमुळेच त्यांनी उलगुलान चळवळ सुरू केली. बिरसा मुंडा यांनी जर्मन मिशन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. जिथे त्याच्या अभ्यासादरम्यान त्याला कळले की ब्रिटिश हळूहळू आदिवासींना ख्रिश्चन बनवत आहेत. यानंतर त्यांनी शाळा सोडली आणि ख्रिश्चन धर्माचा त्याग केला आणि ‘ बिरसायथ ‘ हा नवीन धर्म सुरू केला .
बिरसांना जेव्हा अटक झाली तेव्हा तुरुंगात एकांतवासात ठेवण्यात आलं होतं. तिथे कोणाचीही भेट होऊ दिली नव्हती. सूर्यप्रकाश मिळावा म्हणून फक्त त्यांना तासभर कोठडीच्या बाहेर आणलं जायचं. असंच एकेदिवशी बिरसा झोपेतून उठल्यावर त्यांना खूप ताप चढला होता, अंगात त्राण उरले नव्हते. त्यांचा घसा इतका सुजला होता की पाणी गिळणं ही शक्य नव्हतं. थोड्या दिवसांत त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. अशातच 9 जून 1900 रोजी सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर पाणी झालं होतं. लहान आतडं पूर्णपणे नष्ट झालं होतं. शवविच्छेदन अहवालात कॉलरामुळे मृत्यू झाल्याचं निदान करण्यात आलं.
बिरसाच्या साथीदारांचं म्हणणं होतं की, त्यांना विष घालून मारलं. तुरुंग प्रशासनाने त्यांना शेवटच्या क्षणी वैद्यकीय मदतही मिळू दिली नाही. त्यामुळे शंकेला जागा उरली. अखेरच्या क्षणी बिरसा काही क्षणांसाठी शुद्धीवर आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, मी शरीरापुरता मर्यादित नाही. उलगुलान (चळवळ) सुरूच राहील. बिरसाच्या मृत्यूनंतर मुंडा चळवळ शिथिल पडली, पण त्यांच्या मृत्यूनंतर आठ वर्षांनी ब्रिटिश सरकारने ‘छोटा नागपूर टेनन्सी ऍक्ट’ संमत केला. या कायद्यानुसार बिगर आदिवासींना आदिवासींची जमीन खरेदी करता येणार नव्हती.
अबुवा डीशूम अबुवा राज अस बिरसा मुंडा का म्हणाले ?
Post Views: 238
Recent Posts
महाराष्ट्रात महिला असुरक्षित; विधानसभेत गृहमंत्र्यांची धक्कादायक माहिती
March 7, 2026
No Comments
बदलापूरची वाढती लोकसंख्या आणि अपुरी सिव्हर व्यवस्था; पावसाळ्यात पाणी साचण्याची गंभीर समस्या
March 7, 2026
No Comments
बदलापूरचा वेगाने होणारा विस्तार; वाढत्या वसाहतींमध्ये अंतर्गत बससेवेची मागणी तीव्र
March 7, 2026
No Comments
शिस्त, जबाबदारी आणि प्रामाणिकपणाची ‘रॉकस्टार’ कामगिरी
March 7, 2026
No Comments
कल्याण–मुरबाड रेल्वे प्रकल्प पुन्हा चर्चेत; भूसंपादन, मार्गबदल आणि स्थानिक विरोधामुळे काम रखडले
March 6, 2026
No Comments


