लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यासह समर्थकांमध्ये नाराजीची लाट होती. काही समर्थांनी नैराश्येतून टोकाचे निर्णय देखील घेतले. यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असे माजी आमदार सुरेश धस म्हणाले होते. दरम्यान आता पंकजा मुंडे समर्थकांनी केलेल्या मागणीमुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांचे तात्काळ राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे. बीड तालूक्यातील सानपवाडीचे ग्रामस्थ यासाठी आक्रमक झाले आहेत. विधानसभेपूर्वी याबाबतचा निर्णय झाला नाही, तर भाजपला मतदान करणार नाही, असा पवित्राच या ग्रामस्थांनी घेतला.
यासंदर्भात एक बैठक देखील झाली असून या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. आता यावर भाजप काय निर्णय घेते आणि पंकजा मुंडे यांना कशा पद्धतीने संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अशा पद्धतीचा निर्णय न झाल्यास भाजपला काही मतदारसंघांमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या या पद्धतीच्या रोशाला सामोरे जावे लागणार आहे.
पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईपर्यंत भाजपला मतदान नाही; बीडमधील गावाचा निर्धार
Post Views: 223
Recent Posts
महाराष्ट्रात महिला असुरक्षित; विधानसभेत गृहमंत्र्यांची धक्कादायक माहिती
March 7, 2026
No Comments
बदलापूरची वाढती लोकसंख्या आणि अपुरी सिव्हर व्यवस्था; पावसाळ्यात पाणी साचण्याची गंभीर समस्या
March 7, 2026
No Comments
बदलापूरचा वेगाने होणारा विस्तार; वाढत्या वसाहतींमध्ये अंतर्गत बससेवेची मागणी तीव्र
March 7, 2026
No Comments
शिस्त, जबाबदारी आणि प्रामाणिकपणाची ‘रॉकस्टार’ कामगिरी
March 7, 2026
No Comments
कल्याण–मुरबाड रेल्वे प्रकल्प पुन्हा चर्चेत; भूसंपादन, मार्गबदल आणि स्थानिक विरोधामुळे काम रखडले
March 6, 2026
No Comments


